रत्नागिरी : पाऊस आकाशीचा अन् देशभक्तीचाही!

रत्नागिरी : पाऊस आकाशीचा अन् देशभक्तीचाही!

रत्नागिरी पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअंतर्गत 'हर घर तिरंगा' मोहिमेला शनिवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील 100 फुटी स्तंभावरील ध्वजारोहणाने सुरुवात झाली. मुसळधार पाऊसधारांमध्ये भिजत हजारो रत्नागिरीकरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली व राष्ट्रभक्तीची ओळख करून दिली.

जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते हे ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आदी प्रमुख उपस्थित होते. तसेच अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, प्रांताधिकारी रत्नागिरी विकास सूर्यवंशी, रत्नागिरी तहसीलदार शशिकांत जाधव आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या ठिकाणी विविध शाळांचे व महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरिक उपस्थित होते. यामुळे प्रांगण फुलून गेले होते.भव्य असा राष्ट्रध्वज वर जाताना सारेजण स्वातंत्र्याचा जयघोष करीत होतेव सर्वांनी आपापल्या हातातही तिरंगा सन्मानाने धरला होता. त्याच सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मात्र, उपस्थितांचा उत्साह कमी झाला नाही. एक बाजूला आकाशातील पाऊस आणि त्या खाली तिरंग्याला वंदन करीत राष्ट्रभक्तीचा पाऊस असे चित्र या ठिकाणी दिसून आले.

या वेळी पोलिस दलाने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली व पोलिस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीत सादर केले. भर पावसात चिंब भिजत महाविद्यालयीन युवतींनी जयगान यावेळी सादर केले. क्रीडाधिकारी कार्यालयातील स्पर्धेच्या विजेत्यांना यावेळी पुरस्कार देण्यात आले. या रॅलीचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलिस दर, हेल्पिंग हॅन्डस, रत्नागिरी पत्रकार परिषद, व्यापारी संघटना, श्री रत्नागिरीचा राजा मित्रमंडळ यांनी संयुक्तपणे केले. रॅलीत रत्नागिरी ऑटोमोबाईल संघटना, कृषी विभाग, नगर पालिका यांचे चित्ररथ देखील होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news