नगर : निवडणुकीच्या वादातून एकाचा तलवारीने खून

नगर : निवडणुकीच्या वादातून एकाचा तलवारीने खून

करंजी : पुढारी वृत्तसेवा:  पाथर्डी तालुक्यातील देवराई येथे सेवा संस्थेच्या निवडणुकीचा निकाल लागताच, दोन गटात झालेल्या वादात पाच जणांवर तलवारीने हल्ला करण्यात आला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.

अजय गोरख पालवे, विष्णू कैलास पालवे, मनोहर नवनाथ पालवे, वैभव कैलास पालवे, सुमन नवनाथ पालवे या पाच जणांना तलवारीने मारहाण करण्यात आली. त्यामध्ये चार जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. यातील अजय गोरख पालवे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समजली.

पाथर्डी तालुक्यातील देवराई येथे सेवा संस्थेच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी (दि.18) सायंकाळी लागला. यामध्ये सत्ताधारी गटाला 11 जागा मिळाल्या, तर विरोधी गटाला दोन जागा मिळाल्या. निवडणूक निकालानंतर विजयी गटाने गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर दोन्ही गटात वाद झाला.

यामध्ये पाच जणांवर तलवारीने वार झाल्याने गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले. त्यापैकी अजय गोरख पालवे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समजल्यानंतर, गावातील वातावरण तणावपूर्ण झाले. ग्रामस्थांनी रस्त्यावर येऊन आंदोलन सुरू केले. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली. सुमारे दोन तास ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news