नगर : पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या शैक्षणिक वर्षात पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्याच्या हालचाली दिसेना, मात्र मोफत पाठ्यपुस्तके देण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे. आहे. जिल्ह्यासाठी 23 लाख 94 हजार पुस्तके मिळाली असून, सर्व शाळांवर ही पुस्तके पोहोच करण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद, मनपा व अन्य अनुदानित शाळांचा समावेश असणार आहे. या शैक्षणिक वर्षासाठी 4 लाख 23 हजार 722 विद्यार्थ्यांसाठी 24 लाख पुस्तके बालभारतीकडून नगरला मिळालेली आहेत. सीईओ आशिष येरेकर यांच्या सूचनेनुसार शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी प्रत्येक शाळेवर संबंधित पुस्तके पाठविण्याची व्यवस्था केलेली आहे. शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी कार्ले यांनी पाठपुरावा करून त्या-त्या शाळेत पुस्तके पोहोचवली आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शिक्षण व्यवस्थेला घरघर लागली आहे. पहिलीत गेलेली मुले, विना शाळेत जाता व परीक्षा न देताच तिसरीत गेली आहेत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहेच. यंदापासून मात्र शाळा पूर्ववत सुरू होणार आहेत. 'पहिले पाऊल' हा उपक्रम राबवून नवगत मुलांचे स्वागत करण्याच्या सूचना शाळांना केल्या आहेत. यामध्ये वृक्षारोपचाही समावेश आहे.
शासनाने 13 जूपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आता मुलांना 15 जूनपासून शाळेत बोलाविण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. 13 पासून शिक्षकांनी शाळेत हजर व्हायचे आहे, विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेचे नियोजन झाल्यानंतर 15 पासून शाळा सुरू करण्यात येणार
तालुका विद्यार्थी पुस्तके