खंडाळा : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे काल पहाटे गोडावून फोडून तीन टन वजनाचे सोयाबीन चोरट्यांनी लंपास केले. याबाबतची समजलेली माहिती अशी की, श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यालगत त्रिमुर्ती ट्रेडर्स नावाने अमोल राधाकृष्ण बोरकर यांचे भुसार माल खरेदी-विक्रीचे दुकान आहे.
सोयाबीनचा ट्रक भरून पाठवायचा म्हणून दोनशे गोण्या गोडावूनमध्ये भरून ठेवलेल्या होत्या. मध्यरात्रीनंतर दोनअडीच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी गोडावूनचा पत्रा उचकटून सोयाबीनच्या पन्नास गोण्या लंपास केल्या. सदरची सोयाबीन अंदाजे तीन टन वजनाची असून, दीड लाख रुपयांचे आहे. सदरची घटना सकाळी बोरकर यांच्या लक्षात आली.
त्यांनी याबाबत पोलिसांना माहीती दिली.