कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : गोदावरी लाभक्षेत्रात उन्हाळी हंगामाकरीता 12 जूनपासून आवर्तन सुरु करण्याच्या सूचना पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी (रविवारी) जलसंपदा विभागाला दिल्या. गोदावरी लाभक्षेत्रात आवर्तन सोडण्याच्या निर्णयामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गोदावरी धरण समुहातील पाणी साठ्याचा आढावा मंत्री विखे पा. यांनी आज घेतला. यावेळी त्यांनी सूचना दिल्या.
सध्य परिस्थितीत उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई काही गावांमध्ये निर्माण झाली. शेतीसाठी पाणी आवश्यक असल्याने आवर्तन सोडावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी मंत्री विखे यांच्याकडे केली होती. दरम्यान, जलसंपदाच्या अधिकार्यांशी झालेल्या चर्चेनंतर आवर्तन सोडण्यात येणार आहे. पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मंत्री विखे यांनी यावेळी केल्या.
हे ही वाचा :