श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : गेल्या चार-पाच वर्षापासून खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून शेतकर्याची सोयाबीनला मुख्य पसंती राहिली आहे. कमी कष्टामध्ये निसर्गाच्या मदतीने सर्वाधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून सोयाबीनची ओळख. परंतु चालू वर्षी पेरणीनंतर एक महिना पावसाने खंड दिल्यामुळे सोयाबीनच्या झाडांना शेंगा लागल्या नाही. त्यामुळे शेतकर्यांनी सोयाबीन पिकावर थेट रोटा मारून आपला राग व्यक्त केला. काही शेतकर्यांनी जनावरांना चारा म्हणून सोयाबीन पिकाचा वापर सुरू केल्याने पावसाअभावी सोयाबीन बिनने शेतकर्यांना धोका दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
राहता तालुक्यातील चितळी हे दुष्काळी गाव म्हणून परिचित आहे गेल्या पन्नास वर्षापासून या गावाची पैसे वारी 50 पैशापेक्षा कमी आहे. सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे पावसावर अवलंबून असतो. खरीप हंगामातील उत्पन्न हेच प्रमुख साधन मानले जाते. चालू वर्षी जेमतेम पावसामुळे जुलै महिन्यात शेतकर्यांनी खरीप हंगामात सोयाबीन पिकाची पेरणी केली. उत्तम दर्जाचे बियाणे व रासायनिक खतांचा वापर केला. मात्र पेरणीनंतर एक महिन्याचा खंड पडला तरी पाऊस झाला, नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला.
चार-पाच दिवसापासून उन्हाळ्या लाजवेल असे कडक ऊामुळे सोयाबीनच्या उभ्या पिकाने माना टाकले . डोळ्यात जळून जाणारे पिक पाहून शेतकर्यांच्या जीवाला मोठा घोर लागला कृषी विभागाच्या अधिकार्यांनी नियम व अटी अटींचा भटगारा उगारातील पीक पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. परंतु ही पीक पाहणीसाठी सर्वर डाऊन असल्याने नुकसान भरपाई पेक्षा उभ्या पिकात रोटा मारून आपला राग व्यक्त केला. पावसाने दडी मारल्यामुळे चितळी परिसरातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला तो सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे.
हेही वाचा