श्रीरामपूर : भारत जोडो यात्रेसाठी कार्यकर्ते आज जाणार

Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra
Published on
Updated on

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांचे नेतृत्वात निघालेली 'भारत जोडो' यात्रा महाराष्ट्र राज्यात दाखल झालेली आहे. सदर यात्रेसाठी बाळापूर अकोला व शेगाव येथे यात्रेत सामील होण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातून अनेक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने सामील होणार आहेत. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसजन पदयात्री यात्रेत सामील होण्यासाठी आमदार लहू कानडे यांचे नेतृत्वाखाली जनसंपर्क कार्यालय, यशोधन, बेलापूर रोड, श्रीरामपूर येथून दि. 17 रोजी सकाळी 9 वाजता रवाना होणार आहे.

भारत जोडो यात्रेत आमदार लहू कानडे यांच्यासह तालुकाध्यक्ष अरुण नाईक, अशोकनाना कानडे, सतीश बोर्डे, अमृतकाका धुमाळ, अंकुशराव कानडे, अ‍ॅड. समीन बागवान, सोमनाथ पाबळे, विष्णुपंत खंडागळे, आबा पवार, सुरेश पवार, राजेंद्र औताडे, अजिंक्य उंडे, अशोक बागुल, बाळासाहेब इंगळे, राजाराम राशीनकर, पदाधिकारी सामील होणार आहेत. आमदार लहू कानडे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथील काँग्रेस जन मोठ्या संख्येने सामील होणार आहेत. सदर यात्रा श्रीरामपूर येथून दि. 17 रोजी निघून दि. 18 नोव्हेंबला अकोला येथे पोहोचणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news