अहमदनगर : निळवंडे धरणाचा डावा कालवा फोडण्याचा प्रकार; २९ जणांवर कारवाई

अहमदनगर :  निळवंडे धरणाचा डावा कालवा फोडण्याचा प्रकार; २९ जणांवर कारवाई
Published on
Updated on

अकोले; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील निळवंडे धरणाचा डावा कालवा फोडण्याचा आंदोलकांनी प्रयत्न करुन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी आज (दि. १९) अकोले पोलिसांत २९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गाव शिवार ते खानापुर शिवारादरम्यान निळवडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या बांधावर आज (दि.१९) सकाळी आंदोलक जमा झाले. व त्यांनी येथील ओढयाजवळ टिकाव खोऱ्याच्या सहाय्याने खोदण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खानापुर गर्दणी डाव्या कालव्याच्या पुलावर बैठक मांडुन त्यांनी आंदोलन केले. खानापूर परिसरात कलम १४४ लागू असतानाही खानापूर येथे आदोलन करत आंदोलकांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. म्हणुन सुनिता अशोक भांगरे, मिनानाथ सखाराम पांडे, अमित अशोक भांगरे, सुरेश संपत गडाख, बाळासाहेब बाबुराव भांगरे, माधव राजाराम भांगरे, अनिकेत धर्मनाथ थिटमें, बबनराव पुंजाजी तिकांडे, रामहारी तिकांडे, कविता भांगरे, इंदुबाई शिवाजी थिटमे, अनुसयाबाई थिटमे, भाग्यश्री विजय आवारी, विनोद हांडे, विकास बंगाल, संत तिकांडे, महेश भानुदास तिकांडे, राजेंद्र कुमकर, राजेंद्र शेवाळे यासह २९ जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news