निघोज : विजेचा धक्का बसल्याने वाढदिवशीच तरुण शेतकर्‍याचा मृत्यू

निघोज : विजेचा धक्का बसल्याने वाढदिवशीच तरुण शेतकर्‍याचा मृत्यू

निघोज : पुढारी वृत्तसेवा :  निघोज येथील सागर पांडुरंग लामखडे (वय 28) तरुण शेतकर्‍याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. त्याच्या वाढदिवशीच ही दुर्घटना घडल्याने लामखडे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवाराला दुःखद घटनेला सामोरे जावे लागले आहे.  सागर हा साधारण मंगळवारी (दि.27) दुपारी बाराबारा दरम्यान कूपनलिका विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेला होता. त्यावेळी विजेचा धक्का बसला. त्याला शिरूर येथे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. सागर हा अतिशय कष्टाळू व सुस्वाभावी असल्याने त्याचा मित्र परिवार मोठा आहे. मंगळवारी सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  मंगळवारी सागरचा वाढदिवस होता. सोशल मीडियातून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र परिवार कार्यरत असतानाच, दुपारी विजेचा शॉक बसून त्याचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी सोशल मीडियातून समजली. त्यानंतर श्रद्धांजली अर्पण करणारे मेसेज सुरू झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news