जमिनीच्या वादातून तलवारीने हल्ला

जमिनीच्या वादातून तलवारीने हल्ला
Published on
Updated on

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : जमिनीच्या वादातून तिघांना तलवार, गज, काठ्याने मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि.25) सायंकाळी बाबुर्डी घुमट शिवारात घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत रवींद्र कानिफनाथ भगत (वय 27), कानिफनाथ मारुती भगत (वय 45), मीनाबाई कानिफनाथ भगत (वय 40, सर्व रा. बाबुर्डी घुमट, ता. नगर) हे जखमी झाले आहेत.

जखमी रवींद्र भगत यांच्या फिर्यादीवरून पांडुरंग शंकर बोरुडे, आदेश पांडुरंग बोरुडे, सुशांत पांडुरंग बोरुडे, सिंधुबाई पांडुरंग बोरुडे व इतर दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चौघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news