मोठी बातमी: अहमदनगरचं नामांतर आता अहिल्यानगर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा | पुढारी

मोठी बातमी: अहमदनगरचं नामांतर आता अहिल्यानगर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

अहमदनगर, पुढारी ऑनलाईन: संभाजीनगर, धाराशिवनंतर आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर असं झालं असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहमदनगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव आता अहिल्यानगर झाल्याची घोषणा केली. आमच्या कार्यकाळात आणि चौंडीमधील जयंतीच्या कार्यक्रमात या निर्णयाची घोषणा केली हे आमचं भाग्य असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आहिल्यादेवी होळकर नसत्या तर आपल्याला काशी दिसली नसती, आहिल्यादेवी यांनी कधीही भेदभाव केला नाही असं सांगत अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अहमदनगरच नामांतर लवकरच अहिल्यानगर होणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो आहोत. आमच्या सरकारच्या कार्यकाळात आणि चौंडीतील जयंतीच्या कार्यक्रमात या निर्णयाची घोषणा होते आहे, हे आमचे भाग्य आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Back to top button