नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील 45 ओढ्या-नाल्यांवर अतिक्रमण झाले असून, त्यामुळे पावसाळ्यात नागरिकाच्या घरात पाणी शिरते. ओढे-नाले तातडीने खुले करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी येत्या 21 एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापनची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ठोस निर्णय झाल्यास ओढ्या-नाल्यांचा प्रश्न मार्गी निघण्याची शक्यता आहे. शहरातील ओढे-नाले खुले करण्यासंदर्भात मनपाकडून हलगर्जीपणा होत असल्याच्या पार्श्वभूमिवर सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चेंगडे यांनी निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.
निवासी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन ओढ्या-नाल्यांचा विषय मांडला. तर, त्यानंतर जिल्हाधिकार्यांची भेट घेतली. शहरातील ओढ्या-नाल्यांमुळे शहरातील नागरिकांचे जीवनमान धोक्यात आले आहे. येत्या पावसाळ्यात ओढे-नाले मोकळे न केल्यास आपत्तीचे संकट येण्याची शक्यता आहे, असे सांगितले. त्यावर जिल्हाधिकार्यांनी तातडीने बैठक बोलावली असून, येत्या 21 एप्रिल रोजी बैठकर पार पडणार आहे. या बैठकीपूर्वी ओढ्या-नाल्यांच्या विषयाची अद्यायावत टिपणी जिल्हाधिकारी यांना सादर करण्याचे आदेशही महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत.