रमेश चौधरी :
शेवगाव : शासकीय धान्य वितरणात प्रचंड हेराफेरी सुरू असून, या धान्याची वारेमाप लूट होत आहे. शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे मोफत धान्य वाटप करताना मोठ्या प्रमाणात काटकसर केली जात आहेे. तर, दुकानदार लाभार्थ्यांना पावत्या देत नसल्याचे समोर आले. धान्या वितरणात एका महिन्याचे धान्य देऊन दोन महिन्याची नोंद केली जात आहे. याप्रकाराची विशेष पथकामार्फत लाभार्थ्यांकडे चौकशी करण्यात यावी, दोषी दुकानदारांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे. केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेस 1 जानेवारीपासून एका वर्षासाठी 31 डिसेंबरपर्यंत मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला असून, या योजनेत लाभार्थ्यांना गहू आणि तांदूळ धान्याचे वितरण होते.
प्राधान्य कुंटुंब शिधापत्रिकेस प्रति व्यक्ती दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ, अत्योदय शिधापत्रिकेस प्रति कार्ड 15 किलो गहू व 20 किलो तांदूळ, असे मोफत धान्य वितरण केले जातेे. काही अडचणीने डिसेंबर महिन्यातील अन्नाधान्याचे वाटप झाले नाही. त्यामुळे डिसेंबर व जानेवारी महिन्याचे धान्याचे वितरण होते.
या दोन महिन्याचे एकत्रित वाटप चालू असल्याची माहिती लाभार्थ्यांना नसल्याने बहुतांशी दुकानदार, पुन्हा लुटण्याची वेळ आली असे समजून फक्त एकाच महिन्याचे धान्य लाभार्थ्यांच्या पदरात टाकतात. मात्र, बायोमॅट्रिक मशिनवर अंगठा घेताना दोन महिन्याच्या वाटपाचे प्रमाणीकरण करत आहेत. तर, काही लाभार्थ्यांना पुरते एका महिन्याचेही धान्य दिले नसल्याची तक्रार आहेत. शासनाच्या अन्नधान्याचे पोतेचे पोते गायब होत असून, याबाबत वरिष्ठ अधिकार्यांची तपासणी आणि चौकशी कारवी. सध्या बंद असल्याने मिलबाटके लूट होते की, काय असा संशय निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा व राज्यातील योजनेचे अन्नधान्य वितरीत केल्याची स्वंतत्र पावती लाभार्थ्यांना द्यावी लागते. राष्ट्रीय सुरक्षा धान्याच्या पावतीवर मोफत अन्नधान्य वितरण भारत सकारद्वारे दिले जाणारे आहे, असे ठळकपणे सूचित करण्याचे आदेश आहेत; मात्र त्यालाही दुकानदार जुमानीत नाहीत.
शेवगाव तालुक्यात धान्याची आवक
शेवगाव तालुक्यात प्राधान्य योजनेचे 32 हजार 641 शिधापत्रिकेतील एक लाख 44 हजार 317 लाभार्थी आहेत, तर अंत्योदयचे नऊ हजार 743 शिधापत्रिकेचे 44 हजार 494 लाभार्थी आहेत. डिसेंबर महिन्यात प्राधान्यचा गहू दोन हजार 377 क्विंटल, अंत्योदयचा एक हजार 201 क्विंटल व तांदूळ चार हजार 482, तसेच जानेवारीचा प्राधान्यचा गहू दोन हजार 381, अंत्योदयचा गहू एक हजार 272, तांदूळ चार हजार 335 क्विंटल आवक झाली. तर, फेब्रुवारीत धान्याची आवक सुरू असून, आठवडाभरात त्याचे वाटप होण्याची शक्यता आहे.