नगरमध्येही शासन आपल्या दारी..! खासदार डॉ. सुजय विखे

नगरमध्येही शासन आपल्या दारी..! खासदार डॉ. सुजय विखे

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन गावच्या विकासाला चालना द्यावी, यासाठी नवनिर्वाचित सरपंचांनी मनाचा मोठेपणा दाखवावा. नगर तालुक्यात शासन आपल्या दारी हे अभियान सुरू करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ सुजय विखे यांनी दिली. नगर तालुक्यातील नवनिर्वाचित भाजपच्या सरपंच व सदस्यांचा सत्कार नुकताच बुर्‍हाणनगर येथे करण्यात आला. यावेळी खासदार विखे बोलत होते. माजी मंत्री शिवाजी कर्डिले अध्यक्षस्थानी होते. यावेळी भाजयुमोचे सरचिटणीस अक्षय कर्डिले, भाजपचे नगर तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, भाऊसाहेब बोठे, विलास शिंदे, दत्ता नारळे, राम पानमळकर, संभाजी पवार, श्याम घोलप, अनिल करंडे, दिलीप भालसिंग, शंकर साठे, रवींद्र कडूस, अनिल लांडगे, हरिभाऊ कर्डिले, अरुण होळकर, संजय गिरवले आदी उपस्थित होते

खा. विखे म्हणाले, माजी मंत्री कर्डिले यांचे नेतृत्वाखाली नगर तालुक्यातील जनतेने भाजपचे सरपंच व सदस्य मोठ्या संख्येने निवडून दिले जनतेचा विकास कामासाठीचा निधी योग्यरित्या वापरणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी सरकारने सूडबुद्धीचे राजकारण केले. मात्र, आम्ही विकासाचे राजकारण करत असल्यामुळे नगर जिल्ह्यात भाजपचे सरपंच व सदस्य मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात फक्त नारळ वाढविण्याचेच काम झाले. प्रत्यक्षात कुठलीही विकास कामे झाली नाहीत.
माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे नेहमीच पक्षासह सामान्य कार्यकर्ता आणि आम जनतेलाही सहकार्य लाभते. भाजपने नगर जिल्ह्यातील 99 हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रत्येकी पन्नास हजार रुपये जमा केले आहे जिल्ह्यातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. यावेळी भाजयुमो जिल्हा सरचिटणीस अक्षय कर्डिले यांनी प्रास्ताविक केले.

27 पैकी 25 जागांवर भाजप : कर्डिले

जनतेच्या सुखदुःखामध्ये आम्ही सामील होऊन काम करतो. विकासकामांना गती देतो. त्यामुळे जनता आमच्यावर प्रेम करीत आहे. नगर तालुका आमचे कुटुंब म्हणून काम करतो. आमदार असताना कामे केली. आज आमदार नसतानाही जनतेची कामे करतच आहे. त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे पानिपत करीत 27 पैकी 25 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news