कोपरगाव : बाजार समितीतील शेतमाल विक्री सुरू; स्नेहलता कोल्हे यांनी घडविला समेट | पुढारी

कोपरगाव : बाजार समितीतील शेतमाल विक्री सुरू; स्नेहलता कोल्हे यांनी घडविला समेट

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : बाजार समिती येथील शेतकर्‍यांची हक्काची संस्था असून सध्या खरीप हंगामातील पीके काढून ती मोठया प्रमाणात बाजार समितीत शेतकरी वर्ग विक्रीसाठी घेवून येतात. मात्र काही कुरबुरीमुळे शुक्रवारी शेतमाल विक्री व्यवस्था बंद करण्याच्या मार्गावर होती. भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी शेतकरी दिनी येथील शेतकरी, व्यापारी आणि हमाल बांधवांशी चर्चा करून समेट घडवून आणला आणि शेतमाल विक्री व्यवस्था पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे शेतकर्‍यांनी कोल्हे यांना धन्यवाद दिले आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना आपत्ती संकटाशी आपण सर्वचजण दोन हात करतो आहोत.

पर्जन्यमान बर्‍यापैकी आहे, खरीप हंगाम ऐन पीक काढणीत असताना शेतकर्‍यांना अतिवृष्टीमुळे दणका दिला. त्यामुळे जी पिके शेतकर्‍यांच्या हाती लागली होती, ती त्यांनी कोपरगाव बाजार समितीत विक्री व्यवस्थेसाठी आणली. पण स्थानिक पातळीवर भावावरून शुक्रवारी संघर्ष सुरू झाला होता. ही विक्री व्यवस्था पुन्हा आठ दहा दिवस बंद पडली तर शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळेल. त्यांना रब्बी पीक लागवडीसाठी आर्थीक नियोजन करता येणार नाही.  अशा एक ना, अनेक अडचणी असताना स्नेहलता कोल्हे यांनी शुकवारी थेट भेट सर्व समस्या ऐकून घेत, त्यावर समाधानकारक तोडगा काढून बाजार समितीत शेतमाल विकी व्यवस्था पुन्हा सुरू करण्यात आली. याप्रसंगी विविध संस्थांचे आजी माजी संचालक उपस्थित होते.

Back to top button