नगर-मनमाड खड्ड्यांचा आठवड्यात तिसरा बळी | पुढारी

नगर-मनमाड खड्ड्यांचा आठवड्यात तिसरा बळी

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : दुचाकीवरून घराकडे निघालेल्या औरंगाबाद येथील योगेश सहादेव सानप (वय 27) या तरूणाचा नगर -मनमाड महामार्गावरील खड्ड्याने बळी घेतल्याची दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, राहुरी परिसरात महामार्गावरील खड्ड्यांचा हा आठवड्यात तब्बल तिसरा बळी ठरल्याने सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे. दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत खड्ड्यांमुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाल्याने हा तरुण कडेने दुचाकी चालवित असताना अपघातात ठार झाला.

नगर- मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल अनेक वर्षांपासून नागरिकांची ओरड सुरूच आहे. राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होऊनही नगर-मनमाड रस्त्याचे दारिद्य्र कमी होईनासे झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा. डॉ. सुजय विखे पा. व खा. सदाशिव लोखंडे यांनी लक्ष देऊनही परिस्थिती जैसे-थे आहे. यापूर्वी राहुरी- बारागाव नांदूर रस्त्यालगतचा तरूण अजय कारभारी बोरूडे, डिग्रस येथील मीराताई राधाकृष्ण तागड यांचा या रस्त्यावरील खड्ड्यांनी बळी घेतला.

Back to top button