कोंभळी, पुढारी वृत्तसेवा: रात्रीचे दोन वाजलेले, सगळे झोपलेले असताना चोरटे गावाच्या परिसरात आले. चोरट्यांनी घराच्या बाहेरील कड्या लावल्या. एका ठिकाणी शेळ्या चोरल्या. मात्र, कडी लावल्याचा आवाज आल्याने लोक जागे झाले. त्यांनी लगेच पोलिस पाटलांना फोन लावला. पोलिस पाटलांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून गावाच्या परिसरात चोरटे आल्याची माहिती लोकांना दिली. गावकरी जागे झाले अन् शेळ्या सोडून पसार होण्याची वेळ चोरट्यांवर आली.
कोंभळी येथील राजेंद्र रामचंद्र गांगर्डे यांच्या घराची कडी वाजल्याचा आवाज त्यांच्या घरच्यांना आला. त्यांनी पाहिले असता कडी बाहेरून लावल्याचे स्पष्ट झाले. राजेंद्र गांगर्डे रानात झोपले असताना त्यांना घरच्यांनी फोन करून कोणीतरी घराला बाहेरून कडी लावल्याची माहिती दिली. त्यांनी तत्काळ घराकडे जाऊन पोलिस पाटील शरद भापकर यांना घटनेची माहिती दिली. पोलिस पाटलांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून गावाच्या परिसरात चोरटे आल्याची माहिती देऊन ग्रामस्थांना सतर्क केले. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या फोन कॉलमुळे गावकरी जागे झाले.
काही जण घटनास्थळी गेले. पोलिस पाटील शरद भापकर व संदीप भापकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत बबन गांगर्डे यांच्या तीन शेळ्या चोरट्यांनी चोरून नेल्या. ग्रामस्थांनी चोरट्यांचा पाठलाग केला. चोरटे शेळ्या सोडून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. ग्रामस्थांनी चोरट्यांचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. चोरीस गेलेल्या शेळ्या गावकर्यांना सापडल्या. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तत्पर वापरामुळे चोरीची घटना टळली. ग्रामसुरक्षा यंत्रणा, पोलिस, पोलस पाटील शरद भापकर यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
गावच्या परिसरातील चोर्या रोखण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करावा. चोर्यांसारख्या घटना रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रभावी माध्यम ठरत आहे.
-सोमनाथ दिवटे, सहायक पोलिस निरीक्षक, मिरजगाव.