नगर जिल्ह्यामध्ये विखे- पवार यांचा संघर्ष पुन्हा पेटला

नगर जिल्ह्यामध्ये विखे- पवार यांचा संघर्ष पुन्हा पेटला
Published on
Updated on

 कर्जत : गणेश जेवरे :  शिवसेना संपवण्याची काम खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांनी केले आहे. यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही राज्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि शरद पवार यांना सोडावे आणि आपल्या सर्व आमदारांच्या सोबत राहावे असे मत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मांडले.

नगर दक्षिण च भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आज कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संपवण्याचे काम केले आहे आणि मागील दोन वर्षांपासून मी हे सातत्याने बोलत आहे. आणि आता हे सर्वांच्या लक्षात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी वर्षा बांगला सोडला त्यांचे 52 सहकारी त्यांना सोडून गेले मात्र तरीही ते शरद पवार यांना सोडण्यास तयार नाहीत आणि यामुळे खऱ्या अर्थाने हा प्रसंग गंभीरपणे निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेची पूर्णपणे खच्चीकरण केले आहे आणि राज्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली यास फक्त शिवसेना स्वतः जबाबदार आहे.

असे सांगून श्री विखे पुढे म्हणाले की मागील निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनतेने भाजप शिवसेना युतीला मते दिली होती आणि युतीचे सरकार यावं अशी जनतेची अपेक्षा होती. मात्र गद्दारी ही खऱ्या अर्थाने शिवसेनेने केली आहे.

राज्यातील विरोधी पक्षाची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चांगली बजावली असून जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी राज्यातील सरकार अल्पमतात आल्यामुळे या ठिकाणी बहुमताची मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयामध्ये आता हा निकाल गेला आहे त्यामुळे त्यावर आता राजकीय भाष्य करणे योग्य नाही संपूर्ण राज्याचे लक्ष न्यायालयाकडे लागले आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news