कान्हूरपठार ः पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील जनतेची सरकारी कार्यालयांत पिळवणूक केली जात असून, याबाबत जनतेचे समोर येऊन जाब विचारावा, असे प्रतिपादन जि. प. चे माजी सभापती काशीनाथ दाते यांनी केले. पारनेर त्तालुक्यातील पुणेवाडी येथे 71 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या हस्ते येथे करण्यात आले.
अध्यक्षस्थानी जि. प.चे माजी सभापती काशिनाथ दाते होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख रामदास भोसले, सभापती गणेश शेळके,माजी जि.प.सदस्य अॅड.आझाद ठुबे, सरपंच बाळासाहेब रेपाळे, उपसरपंच विशाल दुस्मान,बाबासाहेब रेपाळे,रमेश पुजारी, सुहास पुजारी, भास्कर पोटे, बन्सी रेपाळे, भाऊसाहेब चेडे, कारभारी लांडे, बाजीराव बोरुडे, चंदर डंबरे,अमोल रेपाळे, गोरख पोटे,स्वप्निल पुजारी, बहिरू रेपाळे, बाबाजी दुस्मान,अनिल दुस्मान, युवराज दुस्मान, उपस्थित होते.
दाते म्हणाले की, समाजाते चांगले काम करणारी माणसे आहेत. त्यांच्या पाठीमागे समाज उभा राहील तरच तालुक्यात चांगल्या विचारांचे वातावरण तयार होईल. तहसीलमध्ये कुठलीही कामे मार्गी लागत नाहीत. तलाठी गावात महिना महिने येत नाही. पोलिस ठाण्यातही तशीच परिस्थिती आहे.
तालुका प्रशासनावर कोणाचा वचक राहिला नाही. तहसीलमध्ये उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. वारस नोंदी, 7/12 वरील फेरफार नोंदी वर्षांनुवर्षे होत नाही. तहसीलमध्ये कामाकरीता गेलो असता, त्यांनी मला ऑनलाईन पहा, उत्तर दिले. ही परिस्थिती चांगली नाही सरपंच, -बाळासाहेब रेपाळे, पुणेवाडी.
पुणेवाडी ः विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी माजी आमदार विजय औटी, काशीनाथ दाते, रामदास भोसले, सभापती शेळके, अॅड. आझाद ठुबे.