नगर : पर्यावरण संवर्धनामध्ये मिरजगाव अव्वल

मुंबई : येथे आयोजित माजी वसुंधरा अभियानअंतर्गत स्पर्धेचे सन्मान स्वीकारताना सरपंच सुनीता खेतमाळस, प्रताप साबळे, अमोल जाधव आदी.
मुंबई : येथे आयोजित माजी वसुंधरा अभियानअंतर्गत स्पर्धेचे सन्मान स्वीकारताना सरपंच सुनीता खेतमाळस, प्रताप साबळे, अमोल जाधव आदी.
Published on
Updated on

मिरजगाव : पुढारी वृत्तसेवा

राज्यस्तरावरून 574 ग्रामपंचायती पैकी 77 ग्रामपंचायतीची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. यामध्ये मिरजगाव (ता.कर्जत) ग्रामपंचायतीने राज्यात पर्यावरण संवर्धनात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. माझी वसुंधरा अभियान-2 अंतर्गत भूमि, जल, वायू, अग्नी व आकाश या पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली.

माझी वसुंधरा अभियान- 2 मधील नगर जिल्ह्याची कामगिरी सर्वोत्तम झाली असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचा सन्मान करण्यात आला. माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने केलेल्या कामगिरीबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालयाने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पाणी व स्वच्छताचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे व त्यांच्या टीमचे अभिनंदन करण्यात आले.

'माझी वसुंधरा अभियान-2' मध्ये जिल्ह्यातील 574 ग्रामपंचायतीनी सहभाग घेतला होता. या ग्रामपंचायतींनी सामाजिक माध्यमांद्वारे जनजागृती, विविध स्पर्धांचे आयोजन, सवांदाचे उपक्रम राबवून वर्षभर जनजागृती करण्यात आली. पर्यावरण संवर्धनचे पारितोषिक व सन्मान मिरजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता खेतमाळस, ग्रामविकास अधिकारी प्रताप साबळे, कर्जत पंचायत समितीचे ग्राम विकास अधिकारी अमोल जाधव, नितीन खेतमाळस, ग्रामपंचायत कर्मचारी निशांत घोडके आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news