प्रेम प्रकरण उघड केल्याने तरुणाला बेदम मारहाण | पुढारी

प्रेम प्रकरण उघड केल्याने तरुणाला बेदम मारहाण

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा

संगमनेर तालुक्यातील वरंवडी येथील प्रशांत संजय केदारी (वय 29) या तरुणाला प्रेम प्रकरण उघड केल्यामुळे चौघांजणानी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत मुबंई येथे दाखल केलेला गुन्हा आश्वी पोलिस ठाण्यात वर्ग झाल्यामुळे ही माहिती मिळाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वरंवडी गावच्या शिवारात दि. 31 मे रोजी 4.30 च्या सुमारास शंकर भास्कंर दळवी, गणेश दत्तात्रय साखरे, मच्छिंद्र साळवे व नवनाथ उत्तरेश्वर मुळे (सर्व रा. भोसरी, ता. पिपंरी चिचंवड, जि. पुणे) यांनी प्रशांत संजय केदारी या तरुणाच्या घरात घुसून तू आमच्या पाहुण्याच्या मुबंई येथील घरी जाऊन तुमच्या पत्नीबरोबर सात वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे सांगून मोबाईलमधील माहिती त्यांच्या मोबाईलवर का पाठवली.

Chittagong Fire : कंटेनर डेपोला भीषण आग, 37 कामगारांचा होरपळून मृत्यू

तु आमच्याबरोबर मुंबईला चाल व त्यांना हे सर्व खोटे असल्याचे सांग असे म्हणत गणेश साखरे याने शिवीगाळ केली. तसेच बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी चौघानी प्रशांत केदारी याला त्याच्याकडील तवेरा (एम. एच. 14 बीके. 6625) गाडीत बळजबरीने बसवले. यावेळी त्यांनी आरडाओरड करण्यास सुरवात केल्याने चौघानी त्याला लाथाबुक्यासह टामीने मारहाण करुण जखमी केले.

तसेच आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे देवनार पोलिस ठाणे, मुबंई येथे गुन्हा दाखल केला होता.
सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. डी. साळुंखे व पोलिस हवालदार आर. एस. पाटील यांनी याबाबत रिपोर्ट आश्वी पोलिस ठाण्यात सादर केल्यानंतर आश्वी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या गुन्ह्यातील चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांंना न्यायालयात हजर केले असता 6 जूनपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास आश्वी पोलिस करत आहेत

Back to top button