जेव्हा जेव्हा जागतिक शेती अडचणींमध्ये येते , तेव्हा तेव्हा तिथे भारतीय शेतीचे रोल मॉडेल डोळ्यासमोर ठेऊन काम केले जाते . अगदी जर्मनी ,जपान ,चीन यांनी देखील भारतीय शेतीचे नेहमी कौतुक केले आहे. आज जागतिक उत्पादन हे घटत असून युद्धजन्य परिस्थिती मध्ये गहू ,कापूस ,सोयाबिन ,कांदा या पिकांची निर्यात भारत मोठ्या प्रमाणात करत आहे हि मोठी कौतुकाची बाब म्हणावी लागेल, आणि हे सर्व श्रेय येथील शेतकऱ्यांचे आहे. आणि त्यामुळे हे शक्य होत आहे. चालू वर्षी देखील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी जास्तीत जास्त बिज प्रक्रिया करून २० ते २५ टक्के उत्पादन लक्ष ठेवले पाहिजे या निमित्ताने अश्वमधे चे संशोधक डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे आणि शेतकऱ्यांना खरिफ हंगाम यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.