पश्चिम महाराष्ट्रात 62 टक्के शेतकरी अल्पभूधारक
संकलन; महेश पांढरे : कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील जवळपास 23 लाख 30 हजार 415 शेतकर्यांकडे आता एक हेक्टरपेक्षा कमी जमीन उरली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक अल्पभूधारक शेतकरी सातारा जिल्ह्यात आहेत. एकूण 62 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. सातारा जिल्ह्यानंतर कोल्हापूर, पुणे, सांगली, सोलापूर असा अल्पभूधारक शेतकर्यांचा क्रम लागतो.
- गेल्या काही वर्षांत पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेती क्षेत्रामध्ये झपाट्याने घट झालेली आहे.
- वाढते औद्योगिकीकरण, नवे उद्योग, नवे प्रकल्प, रस्ते, धरणे, नवे रेल्वे प्रकल्प तसेच मानवी वसाहतीसाठी बिगरशेतीकरणाचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. त्यामुळे शेती क्षेत्राचा वापर या प्रकल्पांसाठी होत असल्याने उपलब्ध शेती क्षेत्रामध्ये झपाट्याने घट होत चालली आहे.
- वडिलोपार्जित असलेल्या जमिनीमध्ये हिस्से पडल्याने शेतजमिनीचे वाटप झाल्यानेही शेती विभागली गेली आहे. त्यामुळे भाव-भावकीत वाटप झाल्यानंतर शेती क्षेत्रात घट झाली आहे.
- पुरेशी शेती नसल्याने अनेकांनी आता शेती हा व्यवसाय सोडून शहरात नोकरी आणि उद्योग शोधला आहे.
- गेल्या दहा-बारा वर्षार्ंत लाखो शेतकरी भूमिहीन झाले आहेत.
जिल्हानिहाय अल्पभूधारकांची संख्या
जिल्हा अल्पभूधारक शेतकरी एकूण शेतकरी टक्के
कोल्हापूर 504117 660676 76
सातारा 680670 903900 75
सांगली 335037 552328 60
पुणे 485204 829328 58
सोलापूर 325387 777441 41
एकूण 2330415 3723673 62