राज्यात 2063 तृतीयपंथीयांना शासकीय ओळखपत्र

राज्यात 2063 तृतीयपंथीयांना शासकीय ओळखपत्र
Published on
Updated on

शिवाजी शिंदे

पुणे : राज्यात आतापर्यंत 2 हजार 63 तृतीयपंथीयांना शासकीय ओळखपत्रे दिली आहेत. तृतीयपंथीय नागरिकांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, समाजात त्यांना नावलौकिक मिळावा, यासाठी राज्य शासनाच्या वतीने स्वयंरोजगार मेळावे, व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे या नागरिकांना समाजात ताठ मानेने उभे राहता येईलच; शिवाय त्यांना हक्काचे स्वयंरोजगाराचे साधन मिळणार आहे.

केंद्र शासनाने देशातील विविध राज्यातील तृतीयपंथीयांची नोंद व्हावी, त्यांना ओळखपत्र, प्रमाणपत्रे मिळावीत तसेच त्यांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार राज्यात मागील सुमारे दोन वर्षांपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रीया सुरू केली आहे. त्यानुसार आतापर्यंत 2 हजार 63 तृतीयपंथीयांना ओळखपत्राबरोबरच प्रमाणपत्रे मिळाली आहेत. तसेच अजून ओळखपत्र अगर प्रमाणपत्रांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरूच आहे.

राज्यातील तृतीयपंथीय नागरिकांना स्वत:ची ओळख मिळावी यासाठी राज्य शासनाने आणख एक पाऊल उचलले असून स्वतंत्र कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळामध्ये तृतीयपंथीयांना हक्काचे संरक्षण मिळणार आहे. याबरोबरच त्यांना समाजात ताठ मानेने उभे राहता यावे, यासाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने वेगवेगळ्या योजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाने राज्यातील 36 जिल्ह्यासाठी 13 लाख 50 हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

तृतीयपंथीयांसाठी विविध कार्यक्रम

  • हक्काचे संरक्षण व कल्याण मंडळ स्थापन
  • जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती
  • राज्य शासन राबवत असलेल्या विविध योजनांच्या जागृतीसाठी जागरुकता कार्यक्रम
  • तृतीयपंथीयासांठी आरोग्य शिबिरे
  • स्वयंरोजगारासाठी मेळावे, व्यवसायासाठी प्रशिक्षण
  • प्रत्येक जिल्ह्यासाठी 13 लाख 50 हजारांचा निधी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news