राज्यात पुन्हा दोन दिवस पावसाचा इशारा; शेतकरी चिंतेत | पुढारी

राज्यात पुन्हा दोन दिवस पावसाचा इशारा; शेतकरी चिंतेत

पुणे : राज्यात पुन्हा दोन दिवस वादळी वार्‍यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणात 11 रोजी, तर उर्वरित राज्यात 13 व 14 मार्च रोजी हा इशारा देण्यात आला आहे. फेब्रुवारीत राज्यात संपूर्ण महिनाभर प्रखर ऊन होते. बहुतांश शहरांचे किमाल तापमान 37 ते 39 अंशांवर गेले होते. पुणे शहरासह रत्नागिरी व मुंबईत उन्हाळा लवकर सुरू झाला. मात्र, मार्च उजाडताच अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पहिल्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागांत जोरदार पाऊस झाला.

Back to top button