नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करतानाच "जीवायएएन" अर्थात "ग्यान" संकल्पनेखाली गरीब, युवक, अन्नदाता शेतकरी आणि नारी, या चार शक्तींच्या बळकटीसाठी काम करण्याचा निर्धार असलेला लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा भाजपने रविवारी घोषित केला. "मोदींची गॅरंटी आणि विकसित भारत -२०४७" संकल्पपत्र, असे नाव दिलेल्या या जाहीरनाम्यात केंद्रसरकारने गरिबांसाठी सुरू केलेली मोफत अन्नधान्य योजना पुढील पाच वर्षांसाठी देखील सुरू राहील, अशी "मोदी गॅरंटी" नमूद आहे. भाजपने सर्वच वर्गातील लोकांसाठी अशा २४ मोदी गॅरंटी दिलेल्या आहेत. तर मग जाणून घेऊया भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक वैशिष्ट्ये BJP Manifesto 2024