रियाध; वृत्तसंस्था : यंदा सौदी अरेबियाने भारतासाठी हजचा कोटा वाढवला आहे. यावेळी एक लाख 75 हजार 25 भारतीय हजला जाणार आहेत. कोणत्याही देशासाठी हा आतापर्यंतचा सर्वोच्च कोटा आहे. 2019 मध्ये एक लाख 40 हजार भारतीयांनी हज यात्रा केली होती. सौदी अरेबियाने हज यात्रेवर कोरोना काळात घातलेले निर्बंध आता पूर्णपणे हटवले आहेत. हजसाठीची वयोमर्यादाही रद्द केली आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला आता हज यात्रेला जाता येईल.
हज यात्रेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू झाले असून, 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. हज यात्रेकरू हज मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाऊन थेट अर्ज करू शकतात. एकच मोबाईल नंबर एकापेक्षा जास्त अर्जासाठी वापरू नये, असे कळविण्यात आले आहे.
यंदा उमरा व्हिसाचा कालावधीही 30 दिवसांवरून 90 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. येणारे लोक देशातील कोणत्याही शहरात जाऊ शकतील.
तौफिक अल-रबिया,
हज आणि उमरा मंत्री, सौदी अरेबिया