राजपक्षे कुटुंंबाला आश्रयाची अफवाच

राजपक्षे कुटुंंबाला आश्रयाची अफवाच
Published on
Updated on

कोलंबो ; वृत्तसंस्था : आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या श्रीलंकेत यादवीची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर अफवा आणि वावड्यांनाही ऊत आला आहे. त्यामुळेच राजपक्षे कुटुंबाला आश्रय दिल्याच्या तसेच श्रीलंकेत भारताने सैन्य पाठवल्याच्या वावड्या या निव्वळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण भारतीय दूतवासाकडून देण्यात आले आहे.

दूतावासाने म्हटले आहे की, काही प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियातून अशी माहिती पसवरली जात आहे की, काही राजकीय नेते आणि त्यांच्या कुटुंबीय भारतात पळून गेले आहेत, मात्र हे खरे नाही. दरम्यान, आंदोलकांनी पंतप्रधानांच्या सरकारी निवसस्थानावरही पेट्रोल बॉम्ब फेकले, गाड्या जाळून टाकल्या. अनेक मंत्र्यांची घरेही जाळली. हिंसाचारात आतापर्यंत 200 हून अधिक जखमी झाले असून 8 मृत्यू झाले आहेत. मृतांमध्ये एका खासदाराचाही समावेश आहे.

* दैनंदिन कामकाजासाठी संरक्षण, अर्थ मंत्रालयाच्या सचिवांची पुनर्नियुक्ती केले आहे. अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाईन नंबर.
* देशव्यापी संचारबंदीची मुदत 12 मे पर्यंत वाढवली.
* हिंसाचारात आतापर्यंत 100 हून अधिक मालमत्तांचे नुकसान. संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्याची विरोधकांची तयारी.

गोळ्या घालण्याचे आदेश नाहीत

आंदोलकांना दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली होती; मात्र श्रीलंकेचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि सैन्याचे कमांडर जनरल शैवेंद्र सिल्वा यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. लष्कर कुठल्याही परिस्थितीत असे पाऊल उचलणार नाही. हिंसक आंदोलनावर नियंत्रण मिळविण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news