मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याबाबत टाळाटाळ; अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याबाबत टाळाटाळ; अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यास तहसीलदार टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. राज्य शासनाने जिल्हा व तालुका प्रशासनांना तातडीने निर्देश देऊन मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याबाबत कोणताही न्यायालयीन अडसर नसल्याचे स्पष्ट करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी प्रवर्गाचे आरक्षण रद्द केल्यानंतरच्या काळात अपूर्णावस्थेत असलेल्या नोकरभरती प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस लाभ देण्याचा निर्णय मागील राज्य सरकारच्या काळात घेण्यात आला होता. मात्र, त्या निर्णयाला उच्च न्यायालयाने रद्दबातल केले आहे. हा निर्णय केवळ अपूर्णावस्थेत असलेल्या नोकरभरती प्रक्रियेतील तत्कालीन एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी होता. या निर्णयाचा आणि मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचे लाभ मिळण्याचा काहीही संबंध नाही. तरीदेखील तहसीलदार मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यास नकार देत आहेत. सध्या अनेक शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया तसेच नोकरभरती प्रक्रियांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असेही अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news