![बीड : सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F12%2F1-41.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नेकनूर (बीड); पुढारी वृत्तसेवा
सक्तीची वीजबिल वसुली बंद करून तात्काळ वीजजोडणी करावी. मांजरसुंबा महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान तात्काळ द्यावे या आणि इतर मागण्यांसाठी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले.
सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात शेतकऱ्यांनी बैलगाड्या घेऊन महामार्ग रोखला. जिल्ह्यातील वीज कंपनीने सक्तीने सुरु केलेली वसुली मोहीम थांबवून तोडलेले वीज कनेक्शन जोडावे. मांजरसुंबा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान द्यावे. या मागण्या घेऊन परिसरातील शेतकरी मांजरसुंबा येथे धुळे-सोलापूर महामार्गावर बैलगाड्या घेऊन चक्काजाम करण्यासाठी उतरले.
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन थांबवले जाणार नसल्याची भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली आहे. बालघाटावरील शेतकरी, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.