जनार्दन कवडे यांचे वडील छगन कवडे यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. त्यांच्या मृत्यूनंतर हे कर्ज फेडण्याची जबाबदारी जनार्दन कवडे व कुटुंबीयांवर आली. शासनाच्या कर्जमाफी योजनेत, आपले कर्ज माफ होईल अशी आशा जनार्दन यांना होती. कर्जमाफीच्या प्रतीक्षेत ते होते. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली, मात्र त्यातील निकषांत ते बसले नाही. परिणामी कर्जमाफी न झाल्याने आता ते कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.