चांदोली : निसर्गाचा अद्भूत, अनोखा कलाविष्कार…

चांदोली : निसर्गाचा अद्भूत, अनोखा कलाविष्कार…

जिल्ह्यात नैसर्गिक सौंदर्याची मुक्‍त उधळण आहे. पावसाळ्यात निसर्गाचा हा अविष्कार अधिकच खुलून दिसतो. हौशी पर्यटनालाही बहर येतो. प्रत्येक आठवड्यात सुटी दिवशी पाहण्यासारखी कोणती पर्यटन स्थळे आहेत, तेथे काय-काय पाहण्यासारखे आहे. जिल्ह्यात असणार्‍या विविध पर्यटन स्थळांची माहिती देणारे सदर आजपासून…

सह्याद्रीची डोंगररचना आणि घनदाट अरण्यांची जोड यामुळे एकूणच चांदोली परिसराला एक आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. 1985 मध्ये चांदोलीला अभयारण्याचा दर्जा मिळाला. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. 2010 मध्ये कोयना व चांदोली मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून विशेष दर्जा प्राप्त झाला. त्यानंतर युनेस्कोनेही त्याचा वारसा यादीत समावेश केला आहे. व्याघ्र प्रकल्पानंतर या अभयारण्यातील वावरावर अनेक बंधने आली असली तरी बफर झोनमध्ये काही ठिकाणी जाता येऊ शकते.

  • श्रवनऔषधींचा खजिना : चांदोलीत बेहडा, जांभूळ, हिरडा, पांगारा, फणस, माड, उंबर, आवळा, आंबा, आपटा असे वृक्ष आणि अडुळसा, कढीलिंब, शिकेकाई, तमालपत्र अशा वनऔषधी आहेत. जलपर्णी, घटपर्णी यांसारख्या दुर्मीळ कीटकभक्ष्यी वनस्पतीही येथे पाहायला मिळतात.
  • श्रवन्यजीवांच्या असंख्या प्रजाती : पट्टेवाला वाघ, बिबट्या गवे, अस्वल, रानडुक्कर, सांबर, वानर, सायाळ, भेकर, ससे, शेकरू, खवले मांजर, भुंकणारे हरिण, काळवीट यांसारख्या अनेक वन्यजीवांचा इथे वावर आहे.
  • श्रपर्यटनस्थळे : चांदोली राष्ट्रीय उद्यानात वसंत सागर जलाशय, कोकणदर्शन, झोळंबी सडा अशी पर्यटनस्थळे आहेत. वसंतनगर जलाशयावर उडणारे रंगीबेरंगी पक्षी, त्यांच्या लकबी आणि आवाजाचं वेगळेपण जाणवल्याशिवाय राहत नाही. फुलपाखरांच्या असंख्य प्रजाती इथे बघायला मिळतात.
  • डोळ्याचे पारणे फेडणारा धबधबा : अभयारण्यात सिद्धेश्वर नावाचे एक ठिकाण आहे. येथे खडकाळ घळी आहेत, इथे अस्वलांचा वावर आहे. वारणा नदीचा उगम, स्वामी समर्थाच्या वास्तव्याने पुनीत झालेली रामघळ, बारमाही वाहणारी रामनदी व त्यापुढे असणारा धबधबा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे.
  • हिरवीगार घनदाट वनराई : वन्य प्राणी निरीक्षणासाठी उद्यानात काही ठिकाणी निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. हिरवीगार घनदाट वनराई, सह्याद्रीचे डोंगर, दुर्मिळ पशुपक्ष्यांचा येथे असलेला राबता आणि मुख्य म्हणजे येथील प्रदूषणरहित वातावरण पाहून आपण एकदम खूश होऊन जातो. नोव्हेंबर ते मार्च तसेच पावसाळा ही पर्यटनासाठी उत्तम कालावधी आहे.
  • असे जावे : चांदोली अभयारण्य मुंबईपासून 380 किमी तर पुण्यापासून 210 किमी अंतरावर आहे. कराडपासून 55 किलोमीटर अंतरावर असल्याने तेथून जाता येते. सांगलीपासून 60 ते 70 किमी आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news