मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजप – शिंदे गटाचे सरकार सत्तेवर आले आहे. मात्र, हे सरकार बेकायदेशीर असून शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरविण्याची याचिका शिवसेनेने दाखल केली आहे. त्यावर आज (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यातील 34 आमदारांनी पक्षाचा व्हिप पाळला नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्याबाबत शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.