Womens IND vs SL Final : अंतिम सामन्‍यात श्रीलंकेविरूध्द दणदणीत विजय, आशिया चषकावर सातव्यांदा उमटवली मोहर

Womens IND vs SL Final
Womens IND vs SL Final
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला आशिया टी 20 चषकावर टीम इंडियाने माेहर उमटवली. अंतिम सामन्‍यात श्रीलंकचा तब्‍बल आठ गडी राखत पराभव केला. भारतीय महिला संघाने या स्‍पर्धेवर सातव्यांदा आपली मोहर उमटली आहे. (Womens IND vs SL Final)

आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र  श्रीलंकेच्या महिला संघाने सुमार कामगिरीचे दर्शन घडविले. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातले. (Womens IND vs SL Final) अवघ्या ६५ धावांमध्ये श्रीलंकेने आपले ९ गडी गमावले. भारतीय महिला गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकन संघाचा डाव ६५ धावांवर पत्यासारखा कोसळला. (Womens IND vs SL Final)

श्रीलंकेच्‍या संघाची 'हाराकिरी', चाैथ्‍या षटकात  तीन विकेट

भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला २० षटकात ९ बाद ६५ धावात रोखत अंतिम सामन्यावर आपली पकड मजबूत केली. भारताकडून रेणुका सिंहने ३ गडी बाद केले. तर, स्नेह राणा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी २ गडी बाद केले. रेणुका सिंहने टाकलेले चौथे षटक श्रीलंकेसाठी फार वाईट ठरले. या षटकात श्रीलंकेने तब्बल ३ गडी गमावले. रेणुका सिंहने चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हर्षता मादवली, चौथ्या चेंडूवर अनुष्का संजिवनी 2 धावाकरून धावबाद झाली. तर पाचव्या चेंडूवर हसिनी परेराला भोपळा ही फोडू न देता बाद केले.

यानंतर, राजेश्वरी गायकवाडने निलाक्षी डिसेल्वाला ६ धावांवर बाद करत लंकेला सहावा दणका दिला. मलिशा शेहानीला स्नेह राणाने शुन्यावर बाद करत श्रीलंकेची अवस्था ७ बाद २५ धावा अशी केली. दरम्यान, स्नेह राणा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी केलेल्या गोलंदाजीमुळे श्रीलंकेच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करू दिली नाही. भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेची अवस्था ४३ धावांवर ९ बाद अशी करून ठेवली. श्रीलंकेच्या इनोका आणि अचिनी यांनी श्रीलंकेन संघाला अर्धशतकी धावसंख्या पार करून दिले. या दोन्ही फलंदाजांनी शेवटपर्यंत झुंज देत लंकेला ६५ धावांपर्यंत पोहचवले.

भारताचा एकतर्फी विजय

 भारताकडून फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाने ४७ धावांची खेळी केली. तर आव्हानाचा पाठलाग करतान स्मृतीला कर्णधार हरमनप्रीत कौरने साथ दिली तिने ११ धावांची खेळी केली. भारताने अंतिम सामन्यात २ गडी गमावून आशिया चषकावर सातव्यांदा आपले नाव कोरले.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news