नवी दिल्ली : जर तुमची खाण्याची वेळ योग्य असेल तर तुम्ही स्वतःला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकता, असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरची एक विशिष्ट योग्य वेळ आहे. यानंतर ते हानिकारक ठरतात. नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण योग्य वेळी झाले पाहिजे, तरच शरीराला त्याचा पूर्ण फायदा होतो.
आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारून तुम्ही अनेक धोकादायक आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारल्या तर लठ्ठपणा, मधुमेह, पोटाशी संबंधित अनेक समस्या आपण टाळू शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे प्रत्येकाने दिवसातून तीनही वेळा खाण्याच्या वेळेकडे सर्वाधिक लक्ष दिले पाहिजे. चला जाणून घेऊया नाश्ता, लंच आणि डिनरसाठी सर्वात योग्य वेळ कोणती? तज्ज्ञांच्या मते, नाश्ता आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी योग्य वेळी नाश्ता करावा. यासाठी सकाळी 7 ते 8 ही उत्तम वेळ आहे. नाश्ता सकाळी 10 नंतर कधीही करू नये. हे लक्षात ठेवले पाहिजे की सकाळी उठल्यानंतर 30 मिनिटांच्या आत काहीतरी खाल्ले पाहिजे. दुपारचे जेवण हे बारा ते दुपारी दोन वाजेपर्यंत करावे. फिट आणि हेल्दी राहायचे असेल तर संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत सायंकाळचे किंवा रात्रीचे जेवण करा. रात्री 9 नंतर कधीही खाऊ नका. झोपण्याच्या 3 तास अगोदर जेवण करणे आरोग्यासाठी चांगले असते.