पाच गावांमधील लोकांना भरली धडकी
राज्यात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाळ्यात दरडप्रवण क्षेत्रात 15-20 वर्षांत तळयीमाच, माळीण व इर्शाळवाडी दरड पडून मोठी जीवितहानी झाली आहे. माळीणची जखम शहारे आणणारी असताना आता रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत झालेल्या घटनेने आंबेगाव तालुक्यातील धोकादायक 5 गावांमधील लोकांना धडकी भरली असून, ते जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. माळीण घटनेच्या वेळी धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या आंबेगाव तालुक्यातील काळवाडी (जांभोरी), बेंढारवाडी (पोखरी), मेघोली (माळीण), पसारवाडी आणि भगतवाडी (फुलवडे) या पाच गावांमध्ये अद्यापही संरक्षक उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.