पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे, नाशिक, कोल्हापूर येथे या सभा होणार होत्या. याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. राज्यात वाढत्या तापमानामुळे या सभा रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. १ मेरोजी मुंबईतील बीकेसी मैदानावर सभा झाली होती. त्यानंतर यापुढे सर्व सभा रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा