पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय औषध कंपनीने उत्पादित केलेल्या औषधांचे सेवन केल्याने उझबेकिस्तानच्या गांबिया शहरातील 18 मुलांनी आपला जीव गमावला आहे. या आधी अशी घटना घडल्याचा दावा उझबेकिस्तान कडून करण्यात आला होता. येथील स्थानिक AKI.com या वृत्तसंस्थेने दिलेल्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. (Gambian Children's Death)
उझबेकिस्तानच्या AKI.com या स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील मारियन बायोटेक या कंपनीने बनविलेली 'डॉक-1 मॅक्स' या औषधामुळे या मुलांचा मृत्यू झाला आहे. या मुलांना तीव्र श्वसनाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २१ पैकी १८ मुलांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती येथील आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. (Gambian Children's Death)
या घटनेनंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून अधिक चौकशी सुरु करण्यात आली आहे. याआधी भारतात बनवलेल्या कफ सिरपमुळे गांबियामधील ६६ मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा उझबेकिस्तानने केला होता. आताच्या या घटनेनंतर पुन्हा एकदा या घटनेशी संबंधीत औषध कंपनी धोक्यात आली आहे.
हेही वाचा