पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरमध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसर्या दिवशी ( दि. २) भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने ऑस्ट्रेलियाच्या शेपटीला तडाखा दिला. त्याने घराच्या मैदानावर १०० कसोटी बळी घेण्याची कामगिरीही पूर्ण केली. आपल्या ३१ व्या कसोटी सामन्यांमध्ये त्याने घराच्या मैदानावर १०० बळी घेण्याची कामगिरी पूर्ण केले आहे.
इंदूर येथे सुरु असलेल्या तिसर्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाने जोरादार पुनरागमन केले. उमेश यादवने कॅमेरून ग्रीन, मिचेल स्टार्क आणि टॉड मर्फी यांची शिकार केली. ७४व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मिचेल स्टार्कला क्लीन बोल्ड करत उमेश यादवने १०० विकेटचा टप्पा पूर्ण केला. तिसर्या कसोटीतील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव १९७ धावांवर संपुष्टात आला असून संघाने ८८ धावांची आघाडी घेतली आहे.
पहिल्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव १०९ धावांवरच आटोपला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १९७ धावा केल्या करत ८८ धावांची आघाडी घेतली. टीम इंडियासाठी पहिल्या डावात रवींद्र जडेजाने ४ आणि उमेश यादव-रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी तीन बळी घेतले.
हेही वाचा :