मराठा आरक्षण आमचेच सरकार देईल : उदय सामंत

उदय सामंत
उदय सामंत

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  मराठा आरक्षण हे आमच्याच सरकारच्या काळात मिळणार आहे. आरक्षण देताना त्यात कोणत्याही त्रुटी राहू नये ते टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार प्रयत्न करत असून, लवकरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

रत्नागिरी येथे रविवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, मराठा समाजाला मी आवाहन करतो की, परिपूर्ण आणि टिकणारे आरक्षण आमचे सरकार देणार असून यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे सरकारवर विश्वास ठेवावा, असेही ना. सामंंत यांनी सांगितले.
यापूर्वी मुख्यमंत्री असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी सकारात्मक भूमिका घेत निर्णय घेतले होते. मात्र, हे आरक्षण परिपूर्ण आणि टिकणारे असावे, यासाठी यात वेळ गेला. मात्र आमचेच सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल, असेही सामंत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news