पुढारी ऑनलाईन: आगरतळाजवळ पश्चिम त्रिपुरातील खोवाई येथे 3.8 रीश्टर तीव्रतेचा सौम्य भूकंप झाला. हा भूकंप आज ( दि.२४ ) स्थानिक वेळेनुसार दुपारी 3:04 वाजता जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू ३१ किमी खोल आहे. अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ट्विटवरून दिली आहे. यासंबंधी अधिक माहिती घेतली जात असून सविस्तर माहिती काही वेळात अपडेट होत असल्याचे
यापूर्वी भारतातील उत्तराखंडमधील पिथुरगडला रविवारी सायंकाळी ६.३४ वाजता ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप, तर म्यानमारमध्ये रविवारी संध्याकाळी१० वाजताच्या दरम्यान ४.४ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के बसले असल्याची माहिती ष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ट्विटवरून दिली होती.