पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या जलसंपदा विभागातील मुख्य अभियंता यांच्यासह अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच उपअधीक्षक अभियंता यांच्यासह सुमारे 95 अधिका-यांच्या बदल्या राज्य शासनाने नुकत्याच केल्या आहेत. या बदल्यांमध्ये काही अधिकार्यांना एक वर्षाची मुदतवाढदेखील दिली आहे. बदलीचे आदेश जलसंपदाच्या विभागाच्या अवर सचिव राखी चव्हाण यांनी काढले आहेत. राज्यातील राजकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर आणि विशेषत: जलसंपदा विभागात झालेल्या बदल्यांना त्यामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांची बदली मुंबई मंत्रालय येथे झाले असून, त्याच्या जागी संजीव चोपडे यांची मुख्य अभियंता म्हणून नियुक्ती झाली आहे. याबरोबरच पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या अधीक्षक अभियंतापदी कुमार पाटील यांची बदली झाली आहे. त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला आहे. तर या पदावर कार्यरत असलेले अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांची बदली झाली आहे.
राजकीय घडामोडीमुळे अधिकार्यांच्या बदल्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता मात्र, नियमानुसार या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार राज्यातील जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच उपअधीक्षक यांच्या बदल्या झाल्या आहेत.
(अधिकारी/ सध्याचा विभाग/बदली विभाग)
पुणे शहर आणि जिल्ह्यातील सिंचनक्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले खडकवासला पाटबंधारे प्रकल्प विभागाच्या अधीक्षक अभियंता या पदावर अजून कोणत्याही अधिकार्यांची नियुक्ती झाली नाही. या पदावर कार्यरत असलेले अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांची सात ते आठ महिन्यांपूर्वी पदोन्नतीने मुख्य अभियंता या पदावर नियुक्ती झाली आहे. तेव्हापासून या पदाचा तात्पुरता पदभार जगताप यांंच्याकडे आहे. मात्र, सर्व बदल्यांमध्ये या अधिकार्याची नियुक्ती होत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा