पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे. राजधानी ढाकाजवळ दोन ट्रेनची धडक झाली. या दुर्घटनेत १७ हून अधिक प्रवासी ठार झाले आहेत. या दुर्घटनेत १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. (Trains Collided In Bangladesh )
भैरब रेल्वे स्टेशन मास्टर युसूफ यांनी सांगितले की, आज दुपारी साडेतीनच्या सुमारास किशोरगंजच्या भैरब उपजिल्हामध्ये पॅसेंजर ट्रेनला मालवाहू गाडीने पाठीमागून धडक दिली. धडकेमुळे दोन प्रवासी गाड्या रुळावरून घसरल्या, या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. गंभीर जखमींची संख्या अधिक असल्याने अपघातातील मृतांचा संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढाका ते चितगाव, सिल्हेट आणि किशोरगंजपर्यंतचा रेल्वे संपर्क विस्कळीत झाला आहे.