उत्तर सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : आमचे प्रेम समाजाला मान्य नाही, अशी चिठ्ठी लिहून प्रेमीयुगुलांनी आपले जीवन संपवले. ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ या गावात सोमवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मागील वर्षीच गणेश विद्यालयात इयत्ता बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेली प्रांजली भारत सुतार व विवाहित असलेले वाजीद चांद इनामदार अशी प्रेमीयुगुलांची नावे आहेत. या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी ७ वाजता सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
दरम्यान, या दोघांनी स्वतंत्र दोन चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. त्या चिठ्ठ्या पोलिसांच्या हाती लागल्या असून आमचं प्रेम समाजाला मान्य नाही… म्हणून हे कृत्य आम्ही करत आहोत, याबाबत कोणासही जबाबदार धरू नये, असा मजकूर चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचलंत का ?