तासगाव शहर : पुढारी वृत्तसेवा राज्यभरात चर्चेत असलेल्या तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी आज (रविवारी) मतदान झाले. दुपारी बारा वाजपर्यंत तब्बल ७४ टक्के मतदान झाले. उन्हाचा कडाका वाढल्याने बारा वाजल्यानंतर मतदारांची गर्दी कमी झाली. मात्र कार्यकर्त्यांची गर्दी प्रचंड होती.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत मतदानावेळी झालेला राडा पाहून पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. गेली तीस वर्ष सलग सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी विरोधात भाजप, काँग्रेस, उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट तसेच राष्ट्रवादीतील काही नाराज उमेदवारांनी केलेल्या बाजार समिती बचाव पॅनलमध्ये दुरंगी निवडणूक होत आहे.
हेही वाचा :