पुढारी ऑनलाईन: मदुराई जिल्ह्यातील उसिलमबत्तीजवळ एका खाजगी फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याची दुर्घटना घडली. या स्फोटाने आग लागून झालेल्या दुर्घटनेत ५ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मदुराईच्या एसपींनी दिली आहे.
या दुर्घटनेत कारखान्यात काम करणाऱ्या पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत कारखाना संपूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मदुराई जिल्ह्यातील उउसिलमबत्तीजवळील एका गावातील फटाक्याच्या कारखान्यात हा स्फोट झाला. यानंतर मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.