![तीन पक्षांच्या सरकारला जनता धडा शिकवेल : सुशीलकुमार शिंदे](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F06%2Fsushilkumar-shinde.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील तीन पक्षांच्या सरकारविरोधात जनतेत रोष निर्माण झाला आहे. येणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवणार असल्याचे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य गांधी फोरमच्या पुरस्कार वितरण प्रसंगी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले की, राज्यातील सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री पदे देऊन महाराष्ट्र राज्यात एक नवी प्रथा सुरू झाली आहे. तीन पक्षांचे सरकार कसे चालते हे येत्या काळात कळेलच. काँग्रेस हा एकनिष्ठ विचारावर चालणारा पक्ष आहे. एकदा हा पक्ष फुटला असून, आता पुन्हा पक्ष कधीच फुटणार नाही. फुटलेल्या पक्षाला येणार्या काळात जनता त्यांना त्यांची जागा नक्की दाखवेल, असेही त्यांनी सांगितले. येणार्या निवडणुकीत जनताच त्यांना धडा शिकवेल, असे शिंदे म्हणाले.