नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांनी मंगळवारी दिल्ली येथे सोनिया गांधी यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये सोनिया गांधी यांनी पक्षात सुरू असलेल्या गदारोळाबाबत राज्यातील आमदारांना प्रश्न केले. तसेच, त्यांनी आमदारांना पाच प्रश्न विचारले. महाविकास आघाडी सरकार आणि काँग्रेसमधील काही मंत्र्यांच्या कामाचाही समाचार त्यांनी घेतला.
दरम्यान, आमदारांनी याबाबत आपली मते मांडावीत असे सांगितले. त्यावर आमदार म्हणाले, राज्य सरकारमध्ये दुर्लक्ष होत आहे असे सांगितले. त्यावर आमदारांना त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन सोनिया गांधी यांनी दिले.