सायरस मिस्त्री यांच्या निधनाने कॉर्पोरेट जगतातील एक तेजस्वी तारा आपण गमावला, शरद पवारांनी व्यक्त केल्या भावना

सायरस मिस्त्री
सायरस मिस्त्री
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. ते एक गतिमान आणि हुशार उद्योजक होते. त्यांच्या जाण्याने कॉर्पोरेट जगतातील एक तेजस्वी तारा आपण गमावला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

टाटा समुहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे निधन झाले. आज (दि. ४) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास मुंबई- अहमदाबाद महामार्गावर पालघरजवळील चारोटी येथे दुभाजकावर कार आदळली. त्यांच्या गाडीमध्ये चार जण होते. या अपघातात मिस्त्री यांच्यासह आणखी एक जणाचा मृत्यू झाल्याची माहिती पालघरचे जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राचे मोठे नुकसान : अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, टाटा सन्सचे माजी प्रमुख प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूने भारतीय उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. भारताने एक कर्तृत्ववान सुपुत्र गमावला आहे. भारतीय उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्ववाने त्यांनी वेगळी छाप उमटवली होती, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्योगपती सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news