पुढारी ऑनलाईन डेस्क :
काही दिवसांपूर्वी संसद आवारात शरद पवारांना बसण्यासाठी खासदार संजय राऊत हे खुर्ची देत असतानाचे छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. त्यावरून विरोधी पक्षांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. आणि नेटकऱ्यांनीही त्यांना चांगलेच ट्रोल केले होते.
या कृतीला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, संसद आवारात पवारांना आपण खुर्ची का दिली? याचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर, त्यांनी पवार साहेबांची ६० भाषणे ऐकली पाहिजेत. तसेच विरोधकांनी पवारांच्या निवडक भाषणांचे "नेमकचि बोलणे" हे पुस्तक जरूर वाचावे.
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त आज मुंबईत "नेमकचि बोलणे " या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. शरद पवारांची सन 1988 ते 1996 च्या काळातील गाजलेली काही निवडक भाषणे या पुस्तकाच्या रूपाने सर्वांसमोर आणण्यात आली आहेत. या कार्यक्रमावेळी संजय राऊत बोलत होते.
राजकारणाचा गाढा अभ्यास असणारे, विकासाची दुरदृष्टी असणारे, देशातील जनतेला हिम्मत देणारे तसेच महाराष्ट्राची अस्मिता सर्वदूर जपणारे शरद पवारांसारखे नेतृत्व आपल्याला लाभले हे भाग्यच आहे. महाविकास आघाडवीर विरोधक करत असलेल्या टिकेला उत्तर देताना त्यांनी, राज्यातील सरकार बेरंग नाही हे विरोधी पक्षाने ध्यानात घ्यावे, असेही यावेळी संजय राऊत
हेही वाचलं का?
व्हिडिओ पहा : कोल्हापूर शहरात आलेला गव्याची आसपासच्या गावात भटकंती सुरूच | Bison spotted near Kolhapur